Tuesday, February 4, 2025

उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी-पियुष गोयल

ऑक्सिजन पुरवठ्यावरून पियुष गोयल भडकले

नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झालं. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असं पियुष गोयल म्हणाले आहेत.

महाराष्ट्रालाच सर्वाधिक ऑक्सिजन

आतापर्यंत भारतात सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र राज्य सरकारांशी रोज संपर्कात असून शक्य तेवढी मदत करत आहे. पंतप्रधानांनी नुकतंच या मुद्द्यावर राज्य आणि केंद्रानं एकत्रितरित्या काम करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. एवढं सर्व असतानाही उद्धव ठाकरे सरकार याचं राजकारण करत असल्याचं पाहून वाईट वाटल्याचं पीयूष गोयल म्हणाले आहेत.

अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार

उद्धव ठाकरेंवर पीयूष गोयल यांनी यावेळी जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या रोजच्या निर्लज्ज राजकारणाचा डोस थांबवून आता जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचं गोयल म्हणाले. महाराष्ट्र सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारच्या तावडीत असून, केंद्र सरकार लोकांसाठी शक्य तेवढे चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.

जबाबदारी स्वीकारा

राज्य सरकारच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीमेचा उल्लेख करतही गोयल यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील लोक अत्यंत कर्तव्यनिष्टपणे त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. आता राज्यातील मुख्यमंत्र्यांनीही त्यांची कर्तव्ये पूर्ण करण्याची वेळ आली असून, त्यांनीही ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ पार पाडवी असं गोयल यांनी म्हटलं आहे.

Hot this week

PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Yojana) ही...

“How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”

The Indian government has introduced significant changes to the...

Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF

New Delhi, February 1, 2025 — Finance Minister Nirmala...

DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले

चीनमधील एक अज्ञात AI स्टार्टअप, डीपसीक (DeepSeek), याने जागतिक...

Topics

PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Yojana) ही...

“How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”

The Indian government has introduced significant changes to the...

Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF

New Delhi, February 1, 2025 — Finance Minister Nirmala...

DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले

चीनमधील एक अज्ञात AI स्टार्टअप, डीपसीक (DeepSeek), याने जागतिक...

What’s DeepSeek? The Chinese AI, Challenging US Dominance

In a stunning turn of events, a relatively unknown...

Nvidia Faces Historic $400 Billion Stock Crash Amid DeepSeek AI Competition

Nvidia, the global leader in AI computing, experienced a...

Chhava movie | ‘छावा’ चित्रपटावरून वाद, लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ Chhava...

Related Articles

Popular Categories