पन्हाळा: कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस टोकाला गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा वातावरणात करंजफेण सारख्या गावातून बिनविरोध निवडणूक पार पडली. ही सकारात्मक बाब आहे. गेली ५६ वर्षे अटीतटीने निवडणूक पार पडत असताना हा नवा पायंडा शिवसेना आणि जनसुराज्य पक्षांनी इतर गावांच्यासाठी घालून दिला आहे. अखेरच्या काही मिनिटात जनसुराज्य व शिवसेना गटाने सामाजिक सलोखा राखत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अन् जनसुराज्य गटाने आपले अर्ज माघारी घेत प्रथम सरपंच पदाचा मान शिवसेना गटाच्या प्राजक्ता चंद्रकांत कांबळे या महाविद्यालयीन तरुणीस दिला. जनसुराज्य गटाकडून कोमल कांबळे व स्नेहा कांबळे यांना पुढील अडीच वर्षानंतर सरपंच पदाची संधी मिळणार आहे. करंजफेण ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुक झाल्यामुळे विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे. या निवडणुकीत ॲड. लालासो पाटील आणि विक्रम पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.
- kolhapur loksabha|मविआतील अंतर्गत वादाचा फटका शाहू महाराजांना बसणार?
- 105 नगरसेवक, 12 महापौरांचा संजय मंडलिकांना पाठिंबा; कॉँग्रेसच टेंशन वाढल?
- करवीरकरांचे जनआंदोलन; दत्तकप्रकरण चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप?
- पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी परीक्षा पुढे ढकलली- राहुल चिकोडे यांच्या मागणीला यश
- Rohit pawar |रोहित पवारांना मोठा धक्का| ईडीकडून साखर कारखाना जप्त