Tuesday, February 4, 2025

MPSC आणि मृगजळ

स्वप्नील लोणकर च्या आत्महत्येने अजुन एकदा एमपीएससी चा कारभार कसा सुरू आहे याच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे . एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन २ वर्षे झाले तरी अजून पुढील प्रक्रिया होत नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून स्वप्नील ने आत्महत्या केली . खूप भयानक आहे .

स्वप्नील हा व्यवस्थेचा बळी आहे अजुन असे असंख्य स्वप्नील त्या वाटेवर आहेत आणि जे हे पाऊल उचलत नाहीत ते नैराश्यात , बेरोजगारीच्या विळख्यात अडकून , उमेदीचे वर्ष घालवून वाट बघत आहेत .

मुळात जे सरकार सत्तेत असते ते सर्वच दोषी आहेत . सर्व पक्ष तेवढेच याला उत्तरदायी आहेत . मुळात एमपीएससी करण्याचा निर्णय जरी उमेदवाराचा वयक्तिक असेल तरील त्याला पूरक वातावरण करण्याची जबाबदारी सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांची आहे .

मागील ३-४ वर्षापासून एमपीएससी तील सावळा गोंधळ दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करून , निवेदने देऊन , मोर्चे काढून , उपोषण करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे .

एमपीएससी विद्यार्थी संघटना मध्ये सुरू असलेले गट तट , पक्षाचे सुरू असलेले घाणेरडे राजकारण , प्रशासकीय स्तरावरील उदासीनता आणि आयोगाचा भोंगळ कारभार या सर्व गोष्टी तेवढ्याच कारणीभूत आहेत .

एमपीएससी आयोगाचे पूर्ण सदस्य नाहीत .
एमपीएससी आयोगाकडे पूर्ण संख्येने कर्मचारी नाहीत.
सामान्य प्रशासन विभाग , राज्य शासन आणि आयोग याच्यांतील समनव्ययाचा अभाव.

याच्यामुळे पदभरती , निकाल , जोईनिंग यांच्यासारखे अगणित प्रश्न आज विद्यार्थ्यांसमोर आहेत , पालकांना यातील वास्तव माहीत नसते त्यामुळे नकळत विद्यार्थ्यावर कोटुंबिक दबाव जस जस वय वाढत जात तस वाढत जातो , स्वतः बद्दल आत्मविश्वास कमी होत जाणे या गोष्टी घडतात.

सर्वांनी याच्याकडे जबाबदारीने पाहणे महत्वाचे आहे . सर्व प्रथम एमपीएससी ही वेळखाऊ आणि संयमाची परीक्षा आहे , प्रसंगी अपयश येऊ शकते कारण यशस्वी होण्याचे प्रमाण १% पेक्षा कमी हे समजून घेतले पाहिजे . ९९% विद्यार्थी हे अपयशी होणार आहेत मग त्यांनी प्लॅन ब याचा जरूर विचार करूनच स्वतः ची जबाबदारी स्वतः घेऊन या क्षेत्रात यावे . एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे शासनाने धोरण आखताना खूप बदल करावे लागणार आहेत वेळोवेळी शासनाला हे बदल सुचवले आहेतच .

विद्यार्थी मित्र मैत्रिणीस प्रेमळ सल्ला , बाळांनो ही परीक्षा म्हणजे अंतिम सत्य नाही जीवनात खूप काही आहे त्यामुळे एक परीक्षा हरली म्हणून टोकाचे पाऊल उचलू नका , आपल्या आई वडिलांचा कुटुंबाचा विचार करा . शेवटी परीक्षा पास होऊन जे मिळवायचं ते न परीक्षा पास होता आलेल्या अनुभवातून इतर क्षेत्रात मिळवता येत त्यासाठी सकारात्मक विचार आणि लढण्याची वृत्ती ठेवा तरच या क्षेत्रात या .

अनुप अरुणा रावसाहेब देशमुख
(अरुणोदय फाऊंडेशन)

Hot this week

PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Yojana) ही...

“How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”

The Indian government has introduced significant changes to the...

Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF

New Delhi, February 1, 2025 — Finance Minister Nirmala...

DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले

चीनमधील एक अज्ञात AI स्टार्टअप, डीपसीक (DeepSeek), याने जागतिक...

Topics

PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Yojana) ही...

“How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”

The Indian government has introduced significant changes to the...

Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF

New Delhi, February 1, 2025 — Finance Minister Nirmala...

DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले

चीनमधील एक अज्ञात AI स्टार्टअप, डीपसीक (DeepSeek), याने जागतिक...

What’s DeepSeek? The Chinese AI, Challenging US Dominance

In a stunning turn of events, a relatively unknown...

Nvidia Faces Historic $400 Billion Stock Crash Amid DeepSeek AI Competition

Nvidia, the global leader in AI computing, experienced a...

Chhava movie | ‘छावा’ चित्रपटावरून वाद, लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ Chhava...

Related Articles

Popular Categories