MPSC Mains | सरकारच्या नाकर्तेपणामुळे उमेदवारांवर पुनःश्च आंदोलनाची वेळ

मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात देखील विद्यार्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षादेखील लांबणीवर गेल्या होत्या या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतप्त होतेच त्यात आता नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. MPSC Mains

gramsevak bharti |ग्रामसेवकभरतीचे ‘या’ दिवशी जाहीरहोणार वेळापत्रक

ZP Exam | ऑनलाइन परीक्षा वेळेत होणे शक्य नाहीच!

13 जानेवारीला पुण्यामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. MPSC Mains या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणारा आहे. नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू केला तर, जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळतील. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे एमपीएससी उमेदवारांवर पुनःश्च आंदोलनाची वेळ. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया बळीराम डोळे यांनी ट्वीट करून दिली आहे.

https://twitter.com/BaliramDoley/status/1610465647586332672?s=20&t=GOpEO-vTNz1s1SFB1LF2WQ

या आंदोलनामध्ये कोंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, मा. आ . मोहन जोशी, रमेश बागवे, संग्राम थोपटे, आरविंद शिंदे आदि कोंग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. MPSC Mains

विद्यार्थ्यांना MPSC आयोगाकडून अपेक्षित असणाऱ्या सुधारणा कोणत्या ते पहा

  • Descriptive Pattern लागू करण्यापूर्वी पुरेसा वेळ दिला गेला आहे का याची पुनर्पडताळणी करून विद्यार्थ्यांना न्याय देणे . ही पद्धत 2025 पासून लागू करण्याची शिफारस होती ; याबद्दल गांभीर्याने विचार करणे .
  • सर्व परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध करतेवेळीच त्या सर्वसमावेशक असाव्यात ; जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करावे लागू नये , यासाठी राज्यसरकारशी / सामान्य प्रशासन विभागाशी समन्वय साधून प्रक्रिया राबविणे .
  • सर्व परिक्षांच्या Final answer key साठी पुरेसा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांची समिती नेमली गेली पाहिजे ; जेणेकरून कमी वेळेत योग्य उत्तरांसाहित final answer key येऊन निकाल वेळेत लागेल तसेच विद्यार्थी जास्त काळ संभ्रमावस्थेत राहणार नाहीत
  • पहिल्या key मधील योग्य उत्तरे बदलून दुसऱ्या key मध्ये चुकीची उत्तरे दिली ; यात चूक कुणाची ? ज्या प्रश्नांची एकापेक्षा जास्त उत्तरे आहेत ते किमान रद्द तरी व्हायला हवे होते ; कोर्टात सुद्धा cases टिकत नाहीत , विद्यार्थ्यांनी कुणाकडे न्याय मागावा ?
vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com