Friday, July 26, 2024

talathi bharti – तलाठी भरती परीक्षा पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात; उबाठा गट आक्रमक

- Advertisement -

talathi bharti – तलाठी भरती ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत, अशा बऱ्याच मुलांना १९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटीप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे  केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. | talathi bharti – तलाठी भरती

काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हंटले की talathi bharti – तलाठी भरती हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे…” अस वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Talathi Exam |तलाठी भरती परीक्षा रद्द करू -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार कैलास पाटील म्हणाले तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही talathi bharti – तलाठी भरतीआणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल तर मग गुन्हे कसे दाखल झाले ? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकार या सगळ्या प्रकरणात पुरावे विद्यार्थ्यांकडून मागत आहेत हे चुकीचे असून सरकारने ही जबाबदारी घेऊन या सगळ्या मागचा मास्टरमाईंड समोर आणावा, तलाठी भरतीची  सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून सरकारने  भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची आता सरकारकडे विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी आहे, ही आमची मागणी आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रकरण आणले बाहेर | talathi bharti – तलाठी भरती

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. यासाठी पेपरफुटीवर कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी वारंवार केली आहे. तलाठीचा Talathi Exam पेपर जाहीर झाला तेंव्हा ही त्यांनी mpsc कडून परीक्षा घ्या अशी मागणी केलेली. जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार आताच्या परीक्षेत दोनशेहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय. तसेच काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवारही परीक्षेत पास झाल्याचा आरोपही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles