Monday, February 3, 2025

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राजाराम कारखान्याच्या प्रचारासाठी उद्याचा शेवटचा दिवस

कोल्हापूर:- राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एकच दिवस शिल्लक राहिला असून दोन्ही गटाकडून जोर लावला जात आहे.
महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेली २८ वर्षे सत्ता महाडिक गटाकडे राहिली असून याला पारंपरिक प्रतिस्पर्धी सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आवाहन दिले आहे. गेली २८ वर्षे कर्जमुक्त असणारा कारखाना व ५ रुपये दराने सभासदांना साखर देणारा साखर कारखाना अशी या कारखान्याची ओळख जपली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जुना साखर कारखाना निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. राज्याचा राजकारणात खासदार धनंजय महाडिक यांचे वजन वाढले असून काँग्रेस मध्ये राज्याचा कार्यकारणीत मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हे बंटी पाटील यांना दिसत असताना ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये महाडिक कुटुंबीय यांच्याकडून विविध सत्ता खेचत सत्तांतर घडवून आणले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीला बंटी पाटील आत्मविश्वासाने सामोरे जात असल्याचे दिसून येत होते. परंतु जसजसा प्रचार सुरू झाला तसतशी उलथापालथ सुरू झाली. माजी चेअरमन सर्जेराव माने हे पाटील गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे पाटील गटाचा आत्मविश्वास आणखी दुणावला परंतु हा आनंद अल्पघटकेचा ठरला. पाटील गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरले. अन् आक्रमक भाषणाने पाटील यांनी लक्ष वेधून घेतले.

एकीकडे सुरुवातीच्या टप्प्यात पाटील गट प्रचंड आक्रमक भूमिका घेत असताना महाडिक गटाचे नेते माजी अमल महाडिक आणि गोकुळच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक संयमी भूमिका घेत प्रश्न उपस्थित केले. अन् अभ्यासू मांडणींने सभासदांची मने जिंकली. सुरुवातीच्या टप्प्यात अमल महाडिक यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असताना शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांनी पाटील गटाला निरुत्तर केले.
माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या सक्रिय सहभागाने राजारामची पाटील गटाला अपेक्षित असणारी निवडणूक अधिक अवघड बनून गेली आहे. एकीकडे महादेवराव महाडिक यांना मानणारा गट अन् महाडिक कुटुंबीयांची ताकद तर दुसरीकडे बंटी पाटील व कुटुंबीय यांना मानणारा गट अशी पारंपरिक निवडणूक बनली असल्याने महाडिक गटाने डी. वाय. पाटील कारखान्यावर आघाडी उघडली. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली असून प्रत्यक्ष सभासद यांच्यावर याचा काय परिणाम होतो? सभासद कोणाला कौल देतात? हे येत्या २३ तारखेला मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर पडेल यात मुळीच शंका नाही.

Hot this week

“How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”

The Indian government has introduced significant changes to the...

Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF

New Delhi, February 1, 2025 — Finance Minister Nirmala...

DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले

चीनमधील एक अज्ञात AI स्टार्टअप, डीपसीक (DeepSeek), याने जागतिक...

What’s DeepSeek? The Chinese AI, Challenging US Dominance

In a stunning turn of events, a relatively unknown...

Topics

“How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”

The Indian government has introduced significant changes to the...

Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF

New Delhi, February 1, 2025 — Finance Minister Nirmala...

DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले

चीनमधील एक अज्ञात AI स्टार्टअप, डीपसीक (DeepSeek), याने जागतिक...

What’s DeepSeek? The Chinese AI, Challenging US Dominance

In a stunning turn of events, a relatively unknown...

Nvidia Faces Historic $400 Billion Stock Crash Amid DeepSeek AI Competition

Nvidia, the global leader in AI computing, experienced a...

Chhava movie | ‘छावा’ चित्रपटावरून वाद, लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ Chhava...

एमएमआर क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुंबई, दि. २७ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या...

Related Articles

Popular Categories