Thursday, September 19, 2024

भारताची इंग्लंडवर मात, IND vs ENG:

Live Janmat

जागतिक क्रमवारीत आघाडीच्या दोन संघांत समावेश असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यात आज एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला गेला. यात भारताने इंग्लंडला 7 धावांनी नमवत मालिका 2-1 अशी नावावर केली. नाणेफेक गमावलेल्या भारताने  प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे इंग्लंडसमोर 330 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 322 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर सॅम करन भारतासमोर उभा राहिला. त्याने नाबाद 95 धावा करत टीम इंडियाचे टेंशन वाढवले, मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने या षटकात अवघ्या 6 धावा दिल्या.

बेयरस्टो एक धावावर बाद

बेयरस्टो अवघ्या एक धावावर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शार्दूल ठाकूरने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवला. त्याने जोस बटलरला पायचीत करत तंबूत परत पाठवले. बटलरने 18 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर मलान आणि लिविंग्स्टोन यांनी डाव सावरला. दोघांनी संयमी खेळी सुरु ठेवली. पण शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर लिविंग्स्टोनही झेलबाद झाला. त्याने 31 चेडूत 36 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाचा समावेश आहे.

मलानचे अर्धशतक

लिविंग्स्टोन नंतर शार्दूलने मलानचा देखील बळी घेतला. मलानने 50 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये सहा चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मोईन अलीने सॅम करनच्या मदतीने डाव सावरला. पण भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने एकदम अचूकपणे त्याचा झेल टिपल्याने तो बाद झाला. मोईनने 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 25 चेंडूत 29 धावा केल्या.

सॅम करनच्या नाबाद 95 धावा

रशीद बाद झाल्यानंततर वूड आणि सॅम करन यांनी पुन्हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. करनने आपली धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. अखेर 14 धावांवर बाद झाला. मात्र, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रोचक ठरला. सॅम करनने शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद 95 धावा केल्या.

भारताचा डाव

भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय (India vs England 3rd ODI)सामन्यात ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर यांनी संकटसमयी केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. भारतीय संघाने टीम इंडियाला 330 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्याला कडवी झुंज देत 329 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडला सुरुवातीच्या ओव्हरमध्येच दोन धक्के बसले आहेत. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दोघांना बाद केले.

भारताला मधल्या फळीनं सावरलं

विशेष म्हणजे भारताच्या पहिल्या विकेटनंतर एकामागे एक अशा दोन विकेट गेल्या. कर्णधार विराट कोहली देखील स्वस्तात तंबूत परतला. विराट मोईन अलीच्या फिरकीचा बळी ठरल्याने तो अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही स्वस्तात तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला. दोघांनी 99 धावांची भागीदारी केली. मात्र, सॅम करनला ही जोडी फोडण्यात यश आलं. सॅमच्या चेंडूवर ऋषभ झेलबाद झाला. त्याने 62 चेंडूत 78 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने अर्धशतक साजरी केलं. पण पुढे बेन स्टोक्सने त्याचा त्रिफळा उडवला. हार्दिकने 44 चेंडूत 64 धावा ठोकल्या. यामध्ये 4 षटके आणि 5 चौकारांचा समावेश आहे

इंग्लंडचा डाव –

पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या तीनशेपार आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला 14 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर मागील सामन्यात शतकी खेळी केलेल्या जॉनी बेअरस्टोला वैयक्तिक एका धावेवर पायचित पकडले. त्यानंतर इंग्लंडला डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्सकडून चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र, नटराजनच्या गोलंदाजीवर स्टोक्स झेलबाद झाला. त्याने 35 धावा केल्या. स्टोक्सनंतर आलेला बटलरही काही खास कामगिरी करू शकला नाही. शार्दुल ठाकूरने त्याला वैयक्तिक 15 धावांवर पायचित पकडले.

चार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि  डेव्हिड मलान यांनी संघाला सावरले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला दीडशेपार नेले. वैयक्तिक 36 धावांवर असताना शार्दुलने लिव्हिंगस्टोनला बाद करत इंग्लंडला संकटात टाकले. दहा धावांच्या अंतरानंतर डेव्हिड मलान अर्धशतक करून बाद झाला. आपल्या खेळीत 6 चौकार  लगावणारा मलान शार्दुलचा तिसरा बळी ठरला. त्यानंतर आलेल्या मोईन अलीने थोडा प्रतिकार केला. मात्र, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर त्याचा पंड्याने अप्रतिम झेल टिपला. मोईन अलीने  29 धावांचे योगदान दिले. त्यानंतर सॅम करन  आणि आदिल रशिद  भारताचा अडथळा ठरले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत टीम इंडियाचा तणाव वाढवला. त्यानंतर विराटने शार्दुलकडे पुन्हा चेंडू दिला. शार्दुलनेही विराटचा विश्वास सार्थ ठरवत आदिल रशिदला बाद केले. विराटने रशिदचा ऑफ साईडला अफलातून झेल टिपला. त्यानंतर करनने झुंजार आणि एकदिवसीय कारकिर्दीचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मार्क वूडला साथीला घेत नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. इंग्लंडला दोन षटकात 19 धावांची गरज होती. 49व्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर भारताने दोन झेल सोडले. शेवटच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज होती. नटराजनने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर दुसरी धाव घेताना मार्क वूड धावबाद झाला. नटराजनने या षटकात अवघ्या 6 धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून शार्दुल ठाकूरने चार, प्रसिध कृष्णाने 3 तर, नटराजनने 1 बळी घेतला.

रशीदकडून विराटची शिकार

धवननंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. मात्र विराट फार वेळ मैदानात टिकला नाही. आदिल रशीदने पुन्हा एकदा विराटला बाद केलं. रशीदने विराटचा त्रिफळा उडवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रशीदने विराटला बाद करण्याची ही नववी वेळ ठरली. विराट बाद झाल्याने भारताची स्थिती 121-3 अशी झाली.

केएल राहुल 7 धावांवर बाद

विराटनंतर केएल राहुल मैदानात आला. पंत आणि राहुलने टीम इंडियाची डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो फार यशस्वी ठरला नाही. 157 धावसंख्या असताना केएल 7 धावांवर बाद झाला.

पंत-हार्दिकची फटकेबाजी

केएल बाद झाल्याने भारत अडचणीत सापडला होता. पण पंत आणि हार्दिक या दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनी मैदानातील प्रत्येक दिशेला फटके मारले. दरम्यान पंतने अर्धशतक झळकावलं. यानंतरही दोघे इंग्लंडच्या फलंदाजांना चोपत होते. मात्र ही सेट जोडी सॅम करनने फोडली.

सॅमने पंतला जॉस बटलरच्या हाती कॅच आऊट केलं. पंतने 62 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावांची खेळी केली. पंत आणि पंड्याने पाचव्या विकेटसाठी 99 धावांची वेगवान आणि महत्वपूर्ण भागीदारी केली.

सर्वच गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नसतात- अमित शहा

Live Janmat

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याची बातमी दैनिक दिव्य भास्करने प्रकाशित केली होती

अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा होती.

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे.

अमित शहा, शरद पवार, भाजप, राष्ट्रवादी
फोटो कॅप्शन,बातमी

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.

राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळते आहे. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. परमबीर सिंह या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

महाविकास आघााडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांना साथीला घेत सरकार स्थापन केले होतं. मात्र अपेक्षित संख्याबळ सिद्ध करता न आल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं.