टी. बी. मुक्त भारतासाठी खा. धनंजय महाडीक यांनी घेतली ५०० रुग्णांची जबाबदारी

कोल्हापूर: टी.बी. मुक्त भारतासाठी (T. B. free India) देशभर निश्चय मित्र अभियान राबवले जात आहे. यामध्ये खाजगी संस्था व व्यक्ति यांनी सामाजिक दायित्व म्हणून अशा रुग्णांची जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक ते न्यूट्रिशन व प्रोटीनचा पुरवठा करावा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास १२०० च्या दरम्यान नोंदणी झाली असून ६०० रुग्ण टी. बी. चे सक्रिय रुग्ण आहेत. यातील खा. धनंजय महाडीक व भीमा परिवाराने ५०० रुग्णांची जबाबदारी स्वीकारली अशी माहिती धनंजय महाडीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच लवकरच टी. बी. मुक्त भारत होईल याबाबत आशावादी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com