कोल्हापूर: टी.बी. मुक्त भारतासाठी (T. B. free India) देशभर निश्चय मित्र अभियान राबवले जात आहे. यामध्ये खाजगी संस्था व व्यक्ति यांनी सामाजिक दायित्व म्हणून अशा रुग्णांची जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक ते न्यूट्रिशन व प्रोटीनचा पुरवठा करावा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास १२०० च्या दरम्यान नोंदणी झाली असून ६०० रुग्ण टी. बी. चे सक्रिय रुग्ण आहेत. यातील खा. धनंजय महाडीक व भीमा परिवाराने ५०० रुग्णांची जबाबदारी स्वीकारली अशी माहिती धनंजय महाडीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच लवकरच टी. बी. मुक्त भारत होईल याबाबत आशावादी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
- कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप सज्ज; शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
- कोल्हापूरच्या ‘कागल पॅटर्न’ने राज्याच्या राजकारणात खळबळ; कट्टर वैरी एकत्र, संजय मंडलिक एकाकी!
- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग | इच्छुक उमेदवारांना थेट जनतेशी जोडल जातंय





