राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवणुकीची रणधुमाळी सुरू आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष राधानगरी ग्रामपंचायत निवडणुकीने वेधून घेतले आहे. गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, विजय बाबा महाडिक यांच्या सोबत भाजप तालुका अध्यक्ष संभाजी आर्डे, राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन दत्तात्रय निल्ले, माजी संचालक सुधाकर साळुंखे सह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस गटाचा पाठिंबाही मिळाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनेलचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राजेंद्र भाटळे यांच्या गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. विकास कामांसाठी तत्पर असणारा सत्ताधारी गट आणि यास विविध पक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. सोबत महाडिक परिवाराच्या सक्रिय भूमिकेमुळे राजेंद्र भाटळे गटाचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय योजना व निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यामुळे राधानगरीचे सुजाण नागरिक नक्कीच विकासाला मत देतील. अशी प्रतिक्रिया राधानगरीचे युवानेते विजय बाबा महाडिक यांनी लाईव्ह जनमतशी बोलताना दिली. त्यामुळे राधानगरीचे नागरिक आपले बहुमत देऊन कोणाला निवडून देते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
- महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
- कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप सज्ज; शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
- कोल्हापूरच्या ‘कागल पॅटर्न’ने राज्याच्या राजकारणात खळबळ; कट्टर वैरी एकत्र, संजय मंडलिक एकाकी!
- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग | इच्छुक उमेदवारांना थेट जनतेशी जोडल जातंय





