Saturday, July 27, 2024

mpsc syllabus | 2025 पासून नवीन पॅटर्न लागू करा अन्यथा …

- Advertisement -

अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात मात्र 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहे. अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थांना मान्य नाही. त्यामुळे नवा अभ्यासक्रमाबाबतच नियम किंवा नवा पॅटर्न 2025 मध्ये लागू करावा, अशी मागणी विद्यार्थांनी  राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत बर्‍याचा लोकप्रतीनिधीनी सरकारकडे पाठपुरावा केला होता पण याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. mpsc

talathi bharti 2022 | राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती

मागील काही वर्षांपासून विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा mpsc अभ्यास करत आहेत. शिवाय मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात देखील विद्यार्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षादेखील लांबणीवर गेल्या होत्या या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतप्त होतेच त्यात आता नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने निर्णय घेतला नाही तर पुन्हा मोठं आंदोलन करु, असा इशारा विद्यार्थांनी सरकारला दिला आहे. नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू केला तर, जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळतील. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. mpsc

2023 मध्ये तुम्हाला Upskill करण्यासाठी Google चे 10 Free Online Courses

urfi javed | ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही’ उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक;

हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता

जुन्या मुलाखती रखडलेल्या आहेत तर राज्यसेवा mpsc 2022 मुख्य परीक्षा झालेली नाही. त्यांच्या मुलाखती होण्यासाठी एप्रिल मे महिना यायचा. मग त्यांनी अभ्यास कधी आणि कसा करायचा? परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू केला तर सध्याचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळणार आहेत. ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयार करायचे आहे ते 2025 साठी तयारी करतील, परंतु नवीन पॅटर्न लागू करण्याचे घाई झाली तर मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

नव्या पॅटर्नला विद्यार्थ्यांचाा नकार नाही मात्र अभ्यासाच्या तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीवर सरकार नेमका कोणता निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचं असणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles